मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी मराठवाडा भूमिपूत्र शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा गौरव

167

संजय निकाळजे
चिखली(BNUन्यूज)मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असलेल्या जाफराबाद येथील न्यू हायस्कूल येथे शाळेच्या मैदानावर शनिवार 17 सप्टेंबर रोजी सकाळी भव्य दिव्य अशा स्वरूपात मराठवाडा मुक्ती संग्रामदिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव बोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक राजाराम तडवी व पालक प्रतिनिधी म्हणून भास्कर भिकाजी दांडगे आणि लिंबाजी गाढवे यांची उपस्थिती होते. सकाळी 7: 50 ला ध्वजारोहण याच्या मुख्याध्यापक साहेबराव बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात समीक्षा पंडित, संध्या सरोदे, साक्षी मरकड यांच्या स्वागत गीताने करण्यात आली. त्यानंतर स्काऊड युनिट संचालन व लेझिम विविध प्रत्यक्षिक साजरी करून समुदायक कवायत झाली.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शिक्षण ऑनलाईन योग्य की अयोग्य, मैदानी खेळ खेळणे योग्य की अयोग्य या विषयावर वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम प्रियंका दांडगे,कोमल भगवान मुरकुटे, प्रत्येकी 500 रुपये रोख व प्रमाणपत्र द्वितीय बक्षीस ऋतुजा गाढवे ,वैशाली सरोदे 300 रू व प्रमाणपत्र वैष्णवी मोरे सिमा पडोळ तृतीय बक्षीस 200 रू व प्रमाणपत्र. दुसरागट प्रेरणा देवडे,प्रियांका सुरडकर प्रथम 300रू व प्रमाणपत्र द्वितीय बक्षीस वेदांत मुरकुटे व समीक्षा पंडित 200रू रोख व प्रमाणपत्र तृतीय बक्षीस साक्षी गुळवे गौरव जाधव 100 रू रोख व प्रमाणपत्र इतर स्पर्धेतील विजेतांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. त्यानंतर मराठवाड्याच्या भूमिपूत्रा शिक्षकांचा शाल श्रीफळ पुषपगुच्छ देऊन मुख्यद्यापकांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

याप्रसंगी रेखाटलेल्या रांगोळी सर्वांचे लक्षवेधून घेत होत्या.या प्रसंगी विध्यार्थी पालकांकडून विद्यार्थांना जवळपास 1800रू बक्षीस रोख मिळाले. त्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य संतोष राठोड, शिवाजी अहिरे,श्रीमती जे. एस.भारंबे व जी. डी.लहाने आदी शिक्षकांनी विचार मांडले. लहाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे महत्त्व सांगत असताना प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर अध्यक्षीय भाषणात साहेबराव बोरकर यांनी देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर मराठवाड्यावर निजाम राजवटी सत्ता होती. निजाम निर उस्मान अली खान याची सत्ता होती. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आठ जिल्हे 78 तालुके 63 बाजारपेठेची मोठे शहर व 64 हजार कि. मी.भूप्रदेश असलेल्या हा भाग होता. या राजवटींच्या अन्याय अत्याचारात जनता भरडून निघाली होती. या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंदतीर्थ,गोविंद श्रॉफ, डॉ.विजय काबरा, रवी नारायण रेड्डी, देविसिंह चौव्हण, बाबासाहेब पराजणे, मनिचंद पाठोडे, जनार्दन होटिकर गुरुजी, गोविंद पानसरे ,जनार्दन मामा नागापुरकर जालना व महिला प्रतिनिधी दगडाबाई शेळके आदींनी लढा दिला. शेवटी तत्कालीन केंद्रीयगृह मंत्री सरदार वल्लभाई पटेल पोलिस अँक्शन सुरू करण्याचा आदेश दिला. छातीवर वार देह झिजविला मातीसाठी कित्येकांनी प्राण अर्पिले मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी रक्त सांडले आपल्यासाठी समारोपीय भाषण करून प्रमुख अतिथी पोलिस उपनिरीक्षक तडवी पोलिस स्टेशन जाफराबाद यांच्या हस्ते हॉलीबोल स्पर्धांचे झाले. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक अशोक कोल्हे यांनी तर आभार प्रदर्शन सहशिक्षक बापूराव पाटील यांनी करून कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन समारोह सांस्कृतिक कार्यक्रम शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षक ,शिक्षकेत्तर ,कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.