वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक.. मनोज दांडगे बुधवारी शेकडो कार्यकर्त्यांसह धाड ते बुलढाणा पदयात्रा काढून केंद्र व राज्य सरकारचा नोंदविणार निषेध !

271

बुलढाणा- (BNUन्यूज) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल मनोज दांडगे हे बुलढाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार 21 सप्टेंबर रोजी वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात परत आणावा तसेच इतर ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी धाड ते बुलडाणा पदयात्रा काढून केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदवित शेकडो कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांना निवेदन देणार आहे.

पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजपचे सरकार व राज्यातील शिंदे गट – फडणवीस सरकारने गेल्या काही दिवसापूर्वी दीड लाख कोटींचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून पळवून गुजरात मध्ये नेला आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील शेकडो बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार होता. बुलढाणा जिल्ह्यात सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. सरसकट जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शिंदे गट-फडणवीस सरकारने बुलडाणा जिल्ह्यातील अनेक कामावरील की जी कामे महाविकास आघाडी सरकारने मंजूर करून कोट्यवधी रुपये उपलब्ध करून देणार होते, त्या कामावरील ती स्थगिती लवकरात लवकर उठवण्यात यावी, त्यामुळे जिल्ह्यातील विकास थांबला आहे. याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकार सातत्याने महागाईत वाढ करून सामान्य जनतेची लूट करत आहे, त्यामध्ये पेट्रोल, डीझेल, गॅस, जीवनावश्यक गरजेच्या वस्तू इतकेच काय अन्नावर सुद्धा केंद्र सरकारने जीएसटी लावला आहे . त्यातच सध्या शिंदे गट – फडणवीस सरकारचे अनेक निर्णय अक्षरशः शेतकरी विरोधी असून सध्याच्या राजकीय सामाजिक परिस्थितीला अनुसरून नसून प्रतिकूल ठरताना दिसून येत आहे.अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत यासह आदी ज्वलंत प्रश्नासंदर्भात तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी वेदांता प्रकल्प परत महाराष्ट्रात आणावा, बुलढाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, बुलडाणा जिल्ह्यातील कामावरील स्थगिती उठवावी , महागाई कमी करावी या न्याय्य मागण्यांसाटी बुधवार 21 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्यातवीने धाड ते बुलडाणा पदयात्रा काढून केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदविणार असल्याचे मनोज दांडगे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.